रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रवासी आणि स्कूल बसमध्ये फायर अलार्म यंत्रणा बसवणे केले बंधनकारक, अपघात रोखण्यास होणार मदत

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 27 जानेवारी 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, AIS (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड)-135 मध्ये सुधारणा करून, बसेसच्या प्रवासी डब्यात फायर अलार्म सिस्टीम आणि अग्निसुरक्षा प्रणाली सुरू केली आहे.

BEST Bus (Photo credits: PTI)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Road Transport and Highways Ministry)  शहरांतर्गत प्रवासी बस (Passenger Buses) आणि स्कूल बसमध्ये (School Buses) फायर अलार्म आणि सप्रेशन सिस्टीम (Fire Protection Systems) बसवणे बंधनकारक केले आहे. शनिवारी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की लांब पल्ल्याच्या बसेसच्या प्रवासी डब्यात अग्निसुरक्षा यंत्रणा बसवली जाईल. हीच अग्निसुरक्षा यंत्रणा स्कूल बसमध्येही बसवण्यात येणार आहे. सध्या, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड-135 नुसार, फायर डिटेक्शन, अलार्म आणि सप्रेशन सिस्टम इंजिनच्या डब्यातून आग लागल्याचे सिग्नल प्रदान करतात. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, 27 जानेवारी 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, AIS (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड)-135 मध्ये सुधारणा करून, बसेसच्या प्रवासी डब्यात फायर अलार्म सिस्टीम आणि अग्निसुरक्षा प्रणाली सुरू केली आहे.

फायर अलार्म सिस्टमच्या स्थापनेची अंमलबजावणी

मंत्रालयाने टाइप III बसेस आणि स्कूल बसेससाठी AIS-135 मध्ये दुरुस्ती करून बसेसमधील प्रवाशांच्या डब्यांमध्ये फायर अलार्म सिस्टम आणि फायर प्रोटेक्शन सिस्टम सुरू केली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, "टाईप-3 बस आणि स्कूल बसमध्ये प्रवासी बसण्यासाठी फायर अलार्म सिस्टीम लागू करण्यात आली आहे." टाइप-3 बसेस लांब पल्ल्यासाठी डिझाइन केल्या आहेत. मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, प्रवासी बसेस आणि स्कूल बसेसच्या भागामध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवावी लागेल जे लोक बसतील अशा लांब पल्ल्याच्या अंतरासाठी बांधले आणि चालवले जातील. (हे ही वाचा Pegasus Spyware: पेगासस प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून तपास; अहवालाची प्रतिक्षा)

अपघातांना आळा घालण्यास मोठ्या प्रमाणात होणार मदत 

यासाठी 27 जानेवारीला अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बसेसमध्ये आग लागण्याच्या घटनांबाबत केलेल्या अभ्यासाचा दाखला देत असे म्हटले आहे की, अशा अपघातांच्या वेळी बसमध्ये बसलेले प्रवासी जास्त तापमान आणि धुरामुळे जखमी होतात. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या बसण्याच्या ठिकाणी आगीची सूचना देणारी यंत्रणा बसवल्यास या अपघातांना बऱ्याच अंशी आळा बसू शकतो. पूर्वसूचना मिळाल्यानंतर प्रवाशांना तात्काळ बस सोडण्यास वेळ मिळणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement