Sikkim Floods: सिक्कीममध्ये पुरामुळे हाहाकार! आतापर्यंत सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक नागरिक बेपत्ता

गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. शोधाचा फोकस तीस्ता बॅरेजच्या डाउनस्ट्रीम भागांवर आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत.

Sikkim Floods (PC -Twitter/ @airnewsalerts)

Sikkim Floods: सिक्कीम (Sikkim) मध्ये आलेल्या पुरात सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या पुरात भारतीय लष्कराचे 23 जवानही बेपत्ता झाले होते. सध्या 15 जवानांचा शोध सुरू आहे. दरम्यान, भारतीय लष्कर उत्तर सिक्कीममध्ये अडकलेल्या नागरिकांना आणि पर्यटकांना अन्न, वैद्यकीय मदत आणि दळणवळण सुविधा पुरवत आहे. पुरानंतर रस्ते व इतर ठिकाणी गाळ साचला आहे. त्यांची साफसफाई करण्याचे कामही सुरू आहे. हवामान सुरळीत राहिल्यास पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करता येईल.

गुवाहाटी येथील संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग रावत यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. शोधाचा फोकस तीस्ता बॅरेजच्या डाउनस्ट्रीम भागांवर आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथील घटनास्थळी लष्कराची वाहने खणली जात आहेत. शोध मोहिमेत मदत करण्यासाठी टीएमआर (ट्रायकलर माउंटन रेस्क्यू), ट्रॅकर डॉग, विशेष रडारसह अतिरिक्त संसाधने आणण्यात आली आहेत. (हेही वाचा - Amritsar Fire News: अमृतसरमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू)

दरम्यान, त्रिशक्ती कॉर्प्स भारतीय लष्कराच्या जवानांनी लाचेन/चातन, लाचुंग आणि चुंगथांग भागात उपस्थित असलेल्या 1471 पर्यटकांचा शोध घेतला आहे. आज हवामानात सुधारणा झाल्यास हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले जाईल, असे मानले जात आहे. राज्य सरकार, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल यांच्या संयुक्त विद्यमाने याचे नियोजन केले जात आहे.

रावत यांनी पुढे बोलताना सांगितले की, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व एजन्सीद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. सिंगताम आणि बुरडांग दरम्यान रस्ता संपर्क पूर्ववत करण्यात आला असून एक लेन वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळी करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement