Crime: जमिनीचा वाद गेला टोकाला, रागाच्या भरात सख्ख्या भावासह कुटूंबाची हत्या

ओडिशातील (Odisha) कटक जिल्ह्यात कुसुपूरमध्ये (Kusupur) मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने त्याचा मोठा भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांची हत्या (Murder) केला. आरोपी शिबा प्रसाद साहू याने व्हिडिओ संदेशाद्वारे गुन्ह्याची कबुली दिली.

(Archived, edited, symbolic images)

ओडिशातील (Odisha) कटक जिल्ह्यात कुसुपूरमध्ये (Kusupur) मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने त्याचा मोठा भाऊ आणि त्याच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांची हत्या (Murder) केला. आरोपी शिबा प्रसाद साहू याने व्हिडिओ संदेशाद्वारे गुन्ह्याची कबुली दिली. कटकपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या जाजपूर जिल्ह्यातील बालीचंद्रपूर पोलीस ठाण्यात (Balichandrapur Police Station) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आलेखा चंद्र साहू, त्यांची पत्नी रश्मी रेखा, त्यांची मुलगी स्मृती संध्या, दोन मुले स्मृती साहिल आणि स्मृती सौरव अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या नोंदवलेल्या कबुलीजबाबात शिबाने म्हटले आहे की, माझा मोठा भाऊ आणि त्याचे कुटुंबीय मला बऱ्याच दिवसांपासून छळत होते.

आमच्या जमिनीवरून झालेल्या वादानंतर त्यांनी मला मारहाण केली. मी दु:खी झालो आणि माझी शांतता गमावली. मी माझ्या भावाचे कुटुंब उध्वस्त केले. कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाने दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य असेल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजपूर येथे राहणारा आरोपी सोमवारी रात्री आपल्या भावासोबत जमिनीच्या वादावर चर्चा करण्यासाठी कुसुपूर गावात आला होता. हेही वाचा Murder: 28 वर्षाच्या संसारात घरगुती मुद्द्यांवरून पती सारखा भांडायचा, वादाला कंटाळून पत्नीने काढला काटा

मात्र, या चर्चेला कुरूप वळण लागले आणि आरोपीने धारदार शस्त्राने सख्खा भाऊ व कुटुंबीयांची हत्या केली. त्यानंतर दरवाजा बाहेरून लावून तो जाजपूरला निघाला. कटक एसपी जुगल किशोर बनोथ यांनी पुष्टी केली की हत्येमागील हेतू जमिनीचा वाद होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अधिक तपशिलांसाठी आरोपीची चौकशी केली जात आहे, बनोथ म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement