India-Bangladesh Border वर Terrorists आणि सुरक्षा दलांत चकमक, एक जवान शहीद

बीएसएफच्या 145 व्या बटालियनचे गिर्जेश कुमार (Girjesh Kumar) असे शहीद जवानाचे नाव असून, त्याला चकमकीत जखमी झाल्यानंतर आगरतळा येथे उपचारासाठी नेण्यात आले.

India-Bangladesh Border वर Terrorists आणि सुरक्षा दलांत चकमक, एक जवान शहीद
Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

उत्तर त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर NLFT (National Liberation Front of Tripura) च्या दहशतवाद्यांशी (Terrorists) झालेल्या भीषण चकमकीत सीमा सुरक्षा दलाचा (BSF) एक जवान शहीद झाला आहे. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. बीएसएफच्या 145 व्या बटालियनचे गिर्जेश कुमार (Girjesh Kumar) असे शहीद जवानाचे नाव असून, त्याला चकमकीत जखमी झाल्यानंतर आगरतळा येथे उपचारासाठी नेण्यात आले. बीएसएफने सांगितले की, 145 बीएन बीएसएफ, सेक्टर पानीसागर, त्रिपुरा यांच्या बीएसएफ गस्ती दलावर NLFT (BM) च्या संशयित बंडखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.

बीएसएफच्या जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर बंडखोर घनदाट जंगलाच्या आडून पळून गेले. या चकमकीत एचसी गिरजेश कुमारला गोळी लागली. जखमी जवानाला तात्काळ हेलिकॉप्टरने आगरतळा येथे नेण्यात आले, तेथे गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. आयजी बीएसएफ त्रिपुरा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि हल्ल्यासाठी जबाबदार बंडखोरांना पकडण्यासाठी बीजीबीच्या जवळच्या समन्वयाने सुरू असलेल्या ऑपरेशनची माहिती घेतली. हेही वाचा Madras High Court On Dr. Ambedkar Photographs: तामिळनाडूतील सर्व विधी महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावणे आवश्यक; मद्रास उच्च न्यायालयाचे निर्देश

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचनपूर उपविभागातील सीमा-2 चौकी परिसरात बीएसएफचे एक पथक ऑपरेशन करत असताना बांगलादेशकडून गोळीबार सुरू झाला. पोलिस अधीक्षक किरण कुमार यांनी सांगितले की, बांगलादेशातील रंगमती हिल्स जिल्ह्यातील जुपुई भागातून जोरदार सशस्त्र अतिरेक्यांच्या एका गटाने बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली.

त्यांनी सांगितले की, या चकमकीत एका बीएसएफ जवानाला चार गोळ्या लागल्या.  घटनास्थळी पोहोचलेले कुमार म्हणाले की, बीएसएफने केलेल्या समन्वित प्रत्युत्तरामुळे अतिरेकी फारसे नुकसान करू शकले नाहीत. ते म्हणाले, या घटनेनंतर भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परिसरात शोधमोहीमही तीव्र करण्यात आली आहे. आवश्यक कारवाईसाठी आम्ही या विषयावर बॉर्डर गार्ड बांगलादेश (BGB) शी बोलू.

(The above story first appeared on LatestLY on Aug 19, 2022 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).