अल्लू अर्जुनने तंबाखूची जाहिरात करण्यास दिला नकार, करोडो रुपयांची ऑफर नाकारली

अल्लू स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे त्यांनी तंबाखू कंपनीची जाहिरात करण्यास नकार दिला. अल्लू चित्रपटांमध्ये सिगारेट ओढत असेल, पण प्रत्यक्षात तो धूम्रपान करत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की ते स्वतः जे सेवन करत नाहीत, त्याचा प्रचार कशासाठी?

अल्लू अर्जुनने तंबाखूची जाहिरात करण्यास दिला नकार, करोडो रुपयांची ऑफर नाकारली
Allu Arjun (Photo Credit - Instagram)

सुपरस्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटातील 'मैं झुकेगा नहीं...' हा प्रसिद्ध संवाद प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. त्याने नाकरलेल्या ऑफरमुळे जगभरात खळबळ उडवून दिली आहे. त्याला अलीकडेच एका मोठ्या तंबाखूच्या ब्रँडची जाहिरात ऑफर करण्यात आली होती आणि त्याला करोडो रुपये दिले जात होते, पण 'पुष्पा'ने ही ऑफर धुडकावून लावायला वेळ घेतला नाही. अल्लूच्या या निर्णयामुळे त्याचे सगळीकडून कौतुक होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने अल्लू अर्जुनला करोडो रुपयांची ऑफर दिली होती, परंतु अल्लूला जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तंबाखूचे सेवन करण्यास सुरवात करावी असे वाटत नाही. अल्लू स्वतः तंबाखूचे सेवन करत नाही. त्यामुळे त्यांनी तंबाखू कंपनीची जाहिरात करण्यास नकार दिला. अल्लू चित्रपटांमध्ये सिगारेट ओढत असेल, पण प्रत्यक्षात तो धूम्रपान करत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की ते स्वतः जे सेवन करत नाहीत, त्याचा प्रचार कशासाठी?

सई पल्लवीने नाकराली होती जाहिरात

काही वर्षांपूर्वी, साऊथ अभिनेत्री सई पल्लवीने फेअरनेस क्रीम्सची जाहिरात करण्याची कल्पना नाकारली आणि करोडोंचा करार नाकारला. रिपोर्टनुसार, या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी सईला 2 कोटी रुपये दिले जात होते.

अक्षय होत आहे ट्रोल

अजय देवगण, शाहरुख खाननंतर अक्षय कुमार पान मसाल्याच्या जाहिरातीत दिसला आहे, ज्यासाठी त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. वास्तविक, अक्षयने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते की, गुटखा कंपन्या त्याला करोडो रुपयांची ऑफर देतात, पण तो स्वीकारत नाही. ते म्हणाले, जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. आता अक्षयचा व्हिडिओ शेअर करून लोक म्हणत आहेत की तो स्वतःचा मुद्दा विसरला आहे. (हे देखील वाचा: बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने दिला गोंडस मुलाला जन्म; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव)

अमिताभ बच्चन पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे झाले होते ट्रोल

अमिताभ बच्चन देखील पान मसाल्याचे प्रमोशन करायचे. यावरून त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. यानंतर त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी ही जाहिरात सोडण्याची घोषणा केली होती. त्यांच्या वतीने असे सांगण्यात आले की, "जेव्हा अमिताभ या ब्रँडशी जोडले गेले होते, तेव्हा त्यांना हे माहीत नव्हते की ते सरोगेट जाहिरातीखाली आले आहे. अमिताभ यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे आणि प्रमोशन फीही परत केली आहे."

 

(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2022 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).