IND vs AUS: भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय, केएल राहुलची खेळी ठरली उल्लेखनीय
कसोटी मालिकेनंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) वनडे मालिकेत विजयाने सुरुवात केली. वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी ज्या खेळपट्टीवर धुमाकूळ घातला त्या खेळपट्टीवर मिचेल मार्शची स्फोटक खेळी, केएल राहुलची लढाऊ खेळी कठीण परिस्थितीतही मोठा फरक दाखवणारी ठरली. ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 188 धावांवर संपुष्टात आणल्यानंतरही टीम इंडियाला सहजासहजी यश मिळाले नाही पण राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. हेही वाचा Virat Kohli Viral Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान विराट कोहलीचा नाटू-नाटू गाण्यावर डान्स व्हायरल, पहा व्हिडिओ
तीन वर्षांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका वानखेडे स्टेडियमवरच सुरू झाली आणि त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा एकतर्फी पराभव केला. त्या सामन्यात भारतीय संघ ऑलआऊट झाला होता पण ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता भारताचा पराभव केला.
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2023 08:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

