IND vs WI Test Series 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी कसोटी संघात 'या' 4 खेळाडूंचे स्थान होवु शकते निश्चित! पुजाराला दाखवला जावू शकतो बाहेरचा रस्ता

भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या तिसर्‍या आवृत्तीत आपल्या मोहिमेची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. जवळपास महिनाभराच्या या दौऱ्यात टीम इंडिया 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान डोमिनिका येथे पहिली कसोटी खेळणार आहे.

IND vs WI Test Series 2023: वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी कसोटी संघात 'या' 4 खेळाडूंचे स्थान होवु शकते निश्चित! पुजाराला दाखवला जावू शकतो बाहेरचा रस्ता
Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघ (Team India) सलग दोनवेळा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत (WTC Final 2023) पोहोचला, पण दुर्दैवाने संघाला दोन्ही वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. अलीकडेच ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचे व्यवस्थापन अनेक कठोर निर्णय घेऊ शकते. भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या तिसर्‍या आवृत्तीत आपल्या मोहिमेची सुरुवात वेस्ट इंडिजविरुद्धच्या (IND vs WI) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. जवळपास महिनाभराच्या या दौऱ्यात टीम इंडिया 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान डोमिनिका येथे पहिली कसोटी खेळणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 20 जुलैपासून त्रिनिदादमध्ये खेळवला जाईल. याबाबत आता टीम इंडियाच्या पथकाशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे.

संघ पूर्णपणे बदलणे चुकीचे

वास्तविक, ओव्हलवरील पराभवानंतर संघातील संयोजन बदलण्याची जोरदार चर्चा आहे. पुजारा लोकांच्या निशाण्यावर असताना रोहितचे कर्णधारपदही लाल चेंडू क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत क्रिकबझने संघात फारसा बदल होणार नसल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर टॉप-5 मधील चार खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे, ज्यामध्ये रोहित शर्माचा समावेश आहे. म्हणजेच व्यवस्थापन रोहितकडे कर्णधार म्हणून पाहत आहे. पण या चौघांमध्ये असा एकही खेळाडू नाही ज्याने 103 कसोटी सामने खेळले आहेत. संघ पूर्णपणे बदलण्याच्या प्रश्नावर एका सूत्राने सांगितले की, सर्व कसोटी सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, त्याचा परिणाम डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलवर होईल. आम्ही कसोटी सामन्यांमध्ये प्रयोग करू शकत नाही. (हे देखील वाचा: IND vs WI Series 2023: वेस्ट इंडिजविरुद्ध 'या' युवा भारतीय खेळाडूंना मिळू शकते पदार्पणाची संधी, आयपीएलमध्ये केली होती जबरदस्त कामगिरी)

या 4 खेळाडूंचे स्थान निश्चित झाले

मिळालेल्या माहितीनुसार, चार टॉप-5 खेळाडूंचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे हे आगामी वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी चेतेश्वर पुजारावरही धोका आहे. बांगलादेश मालिकेपासून पुजारा सातत्याने बाहेर आहे. इंग्लंडमध्ये, तो सतत काऊंटी खेळतो पण तरीही त्याने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडिया आणि त्याच्या चाहत्यांची खूप निराशा केली. इतकंच नाही तर यावर्षी होणार्‍या एकदिवसीय आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी व्यवस्थापन मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना त्यांच्या कामाचा भार सांभाळण्यासाठी विश्रांती देऊ शकते.

पुजाराच्या खराब रेकॉर्डमुळे त्याच्या कारकिर्दीला धोका निर्माण

चेतेश्वर पुजाराने 2020 पासून 28 कसोटी सामने खेळले आहेत आणि 52 डावांमध्ये त्याची सरासरी केवळ 29.69 आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून फक्त एकच शतक झळकले असून त्याने 11 अर्धशतके झळकावली आहेत. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या बांगलादेश मालिकेत पुजाराने एका डावात 90 आणि एका डावात 102 धावा केल्या होत्या. हे दोन डावही काढले तर त्याची सरासरी केवळ 26 आहे. तो संघाचा भाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याच्या फॉर्मने सर्वांची निराशा केली आहे. त्यामुळेच तो संघात असला तरी प्लेइंग 11 मध्ये दिसणे कठीण असल्याचेही बोलले जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 15, 2023 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).