T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यावर संकटाचे ढग, सामना रद्द होणार का?

भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धि पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न या मेदानावर होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी आतुरतने वाट पाहत आहे पण या सामन्यावर आता संकट ओढवले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहंत्याशी पुर्णपणे निराशा होवू शकते.

T20 World Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यावर संकटाचे ढग, सामना रद्द होणार का?
IND vs PAK (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरु होण्यासाठी काही अवघे दिवस राहिले आहे. या दरम्यान भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धि पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला मेलबर्न या मेदानावर होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट प्रेमी आतुरतने वाट पाहत आहे पण या सामन्यावर आता संकट ओढवले आहे. त्यामुळे क्रिकेट चाहंत्याशी पुर्णपणे निराशा होवू शकते. विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. पण 23 ऑक्टोबरला मेलबर्नमधील पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो.

हवामान अंदाजानुसार, मेलबर्नमध्ये 20 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या सामन्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम क्रिकेटप्रेमींची मने फुटू शकतात. हवामान अंदाजानुसार, 23 ऑक्टोबर रोजी पावसाची 60% शक्यता आहे. त्याचवेळी किमान तापमान 12 अंशांवर जाण्याचा अंदाज असून कमाल तापमान 19 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी चाहत्यांची होवू शकते निराशा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या आशिया चषकात दोन्ही संघांमध्ये सामना रंगला होता. दोन्ही संघांनी एकूण दोन सामने खेळले. त्यापैकी एक सामना भारताने तर एक सामना पाकिस्तानने जिंकला होता. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय चाहते वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत हवामानाचा असा मूड करोडो चाहत्यांची मने फोडू शकतो. गेल्या विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महान सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा पराभव, टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला मोठा धक्का)

टी-20 मध्ये हेड टू हेड आकडे

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 11 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 8 सामने भारताने जिंकले आहेत. तर 3 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. मात्र, T20 मध्ये भारताचा वरचष्मा आहे. पण गेल्या विश्वचषकातील पराभवामुळे भारत पाकिस्तानला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.

(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2022 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).