Sourav Ganguly यांच्या ‘या’ 5 निर्णयांनी भारतीय क्रिकेटवर पाडला प्रचंड प्रभाव, बदलला संघाचा चेहरा-मोहरा
टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली एकदिवसीय क्रिकेटमधील एक महान फलंदाजांपैकी आहेत. केवळ फलंदाजीच नव्हे तर गांगुलीच्या नेतृत्व संघाच्या गुणवत्तेचेही आजही कौतुक केले जाते. गांगुलीने कर्णधारपदी असताना काही अविस्मरणीय रणनीतिक निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय क्रिकेटला अनेक वर्ष मदत झाली.
टीम इंडियाचे (Team India) माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली (Sourav Ganguly) एकदिवसीय क्रिकेटमधील एक महान फलंदाजांपैकी आहेत. केवळ फलंदाजीच नव्हे तर गांगुलीच्या नेतृत्व (Ganguly Captaincy) संघाच्या गुणवत्तेचेही आजही कौतुक केले जाते. गांगुलीने टीम इंडियाला जिंकण्याची सवय दिली होती. एकेकाळी मॅच फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकलेल्या टीम इंडियाला बाहेर काढणार्या क्रिकेटच्या 'दादा'च्या नेतृत्वात टीम इंडियाने आपल्या जिद्दीने अनेक मनोरंजक सामने जिंकले आहेत. गांगुलीने कर्णधारपदी असताना काही अविस्मरणीय रणनीतिक निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय क्रिकेटला अनेक वर्ष मदत झाली. आज आपण गांगुलीने घेतलेल्या अशाच पाच निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने भारतीय क्रिकेटवर प्रचंड प्रभाव पडला आणि संघाचा जणू चेहरा-मोहराच बदलला. (IND Vs ENG: कर्णधार विराट कोहलीचा तडाखा; सौरव गांगुलीच्या विक्रमाशी केली बरोबरी)
1. सेहवागला ओपनर म्हणून बढती देणे
मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सेहवागने भारतीय संघात स्थान मिळवले, परंतु त्याला फलंदाजीसाठी अनेक वेळ प्रतीक्षा करावी लागायची कारण भारतीय आघाडीच्या फळीत खरोखरच काही अनुभवी खेळाडू होते. तथापि, गांगुलीला सेहवागला इलेव्हनमध्ये स्थान द्यायचे होते कारण सेहवागकडे सामन्याचा निर्णय बदलण्याची क्षमता असल्याचे त्यांना माहित होते. त्यानंतर, त्याने सेहवागला भारताकडून सलामीला येण्याची उघडण्याची ऑफर दिली आणि सलामीवीर म्हणून अपयशी ठरल्यास मधल्या फळीत त्याला आणखी एक संधी देण्याची ग्वाही देखील दिली. सेहवागने संधीचा फायदा घेतला आणि मागे वळून पहिले नाही.
2. राहुल द्रविडचा विकेटकीपर म्हणून वापर
त्या दिवसांत भारताकडे असलेल्या तज्ञ विकेटकीपरने भारतासाठी पहिल्या 7 मध्ये फलंदाजी करणे तितकेसे चांगले नव्हते. ते विकेटच्या मागे चांगले होते, परंतु त्यापैकी कोणाकडेही फलंदाजीद्वारे सातत्याने धावा करण्याची क्षमता नव्हती आणि तज्ज्ञ विकेटकीपर खेळवणे म्हणजे एका फलंदाजाला बाहेर करणे. तर, गांगुलीने बॉक्समधून बाहेर पडून राहुल द्रविडला विकेटकीपिंग ग्लोव्हज दिले ज्यामुळे भारतीय इलेव्हनमधील तज्ज्ञ फलंदाजासाठी आणखी एक जागा खुली झाली आणि द्रविडच्या रुपात टीम इंडियाला व्हाइट बॉल क्रिकेटमधील यष्टीरक्षकांपैकी एक सर्वोत्कृष्ट विकेटकीपर-फलंदाज मिळाला.
3. मोहम्मद कैफ 7व्या स्थानावर
7व्या क्रमांकावर त्यावेळी एक अष्टपैलू खेळायचा होता, परंतु भारताकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अष्टपैलू खेळाडू नसल्याचे गांगुलीच्या लक्षात आले म्हणून अष्टपैलू खेळाडू म्हणून फक्त एखाद्याच्या खेळाडूला खेळवण्याऐवजी गांगुलीने मोहम्मद कैफच्या रूपात तज्ञ फलंदाज खेळण्याचा निर्णय घेतला. आणि कैफने वनडे क्रिकेटमधील या स्थानावर संघासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
4. ऑस्ट्रेलियामध्ये इरफान पठाणला खेळवणे
2003-04 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इरफानची निवड केल्यावर तो बेंचवरच बसून राहील असा अनेकांनी अंदाज वर्तवला होता, पण गांगुलीने सर्वांना चकित करत टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली. गांगुलीने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दाखवलेल्या विश्वासाने पठाणला एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाजाच्या रूपात यश मिळवून दिले.
5. एमएस धोनीला दिली बढती
2004 फलंदाज म्हणून धोनीची सुरुवात काही चांगली झाली नाही. तो सतत अयशस्वी झाला. प्रत्येकाला वाटले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव धोनी हाताळू शकत नाही पण, दादाला खात्री होती. म्हणूनच त्याने 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध विझाग वनडे सामन्यात धोनीला तिसर्या क्रमांकावर बढती दिली. त्या सामन्यात धोनीने 148 धावा ठोकल्या आणि नंतर क्रिकेटचा महान विकेटकीपर-फलंदाज म्हणून उदयास आला.
(The above story first appeared on LatestLY on Feb 25, 2021 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

