IND vs BAN Weather And Pitch Report: टी-20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध भारताचा असा आहे विक्रम, येथे हवामान आणि खेळपट्टीचे अपडेटही घ्या जाणून
IND vs BAN: भारताचा सामना आज रात्री बांगलादेशशी (IND vs AFG) होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे.
IND vs BAN T20 WC 2024 Super 8: भारतीय क्रिकेट संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) आतापर्यंत अपराजित राहिला आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाने येथेही अफगाणिस्तानविरुद्ध विजयी मोहीम सुरू ठेवली. आता भारताचा सामना आज रात्री बांगलादेशशी (IND vs AFG) होणार आहे. हा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार आहे. हा सामना आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण, भारताने हा सामना जिंकला तर ते उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश करेल. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 WC 2024 Super 8 Live Streaming: सुपर-8 मध्ये भारताची बांगलादेशशी टक्कर, सेमीफायनलच्या तिकीटावर रोहित सेनाची नजर)
हेड टू हेड आकडेवारी
टी-20 सामन्यात भारत आणि बांगलादेश आतापर्यत 13 वेळा आमनेसामने आले आहे. यामध्ये भारताने 12 वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशने फक्त एकदाच विजयाची चव चाखली आहे. त्यामुळे, शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारताचे वर्चस्व दिसत आहे. पण तरीही भारतीय संघाने बांगलादेशला हलक्यात घेणे सोपे ठरणार नाही. कारण, बांगलादेश अटीतटीच्या सामन्यात उलेटफेर करण्यात माहीर आहे, त्यामुळे भारतीय संघाला सावध राहावे लागेल.
टी-20 विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध भारताचे पारडे जड
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशला भारताला कधीही हरवता आलेले नाही. टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने बांगलादेशवर पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने सर्व 4 सामने जिंकले आहेत. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कोर 4-0 आहे.
वाचा खेळपट्टीचा अहवाल
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 विश्वचषकातील सुपर-8 सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत करते. मात्र, येथील खेळपट्टीही फलंदाजांना मदत करते. जसजसा खेळ पुढे सरकतो तसतशी इथली खेळपट्टी संथ होत जाते. या खेळपट्टीवर कोणताही संघ नाणेफेक जिंकेल, त्याला प्रथम फलंदाजी करायची आहे, कारण खेळपट्टी संथ असताना धावांचा पाठलाग करणे कठीण होते.
कसे असेल हवामान?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्यादरम्यान पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो, परंतु सामना वाहून जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. सुपर-8 सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2024 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

