IND vs AUS 3rd Test: कर्णधार Rohit Sharma च्या नावावर नोंदवला गेला 'हा' लाजिरवाणा विक्रम, तिसर्या कसोटीत झाली मोठी चूक
कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. पहिल्या डावाच्या सुरुवातीला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले, पण हिटमॅनला त्याचा फायदा उठवता आला नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border-Gavaskar Trophy 2023) तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण टीम इंडिया (Team India) पहिल्या डावात अवघ्या 109 धावांवर आटोपली. या खेळीदरम्यान कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. पहिल्या डावाच्या सुरुवातीला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले, पण हिटमॅनला त्याचा फायदा उठवता आला नाही.
डावाच्या सहाव्या षटकातच रोहित शर्माने आपली विकेट गमावली. कर्णधार रोहित शर्माला मॅथ्यू कुहनेमनने यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हाती यष्टिचित केले. रोहित शर्माने 23 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 12 धावांची खेळी केली. यासह बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्टंप आऊट होणारा रोहित पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: टीम इंडियासोबत 15 वर्षात चौथ्यांदा असं घडलं, इंदूरमध्ये रचला गेला एक नकोसा असा विक्रम)
सर्वाधिक स्टंप आऊटच्या यादीत समाविष्ट
भारतीय म्हणून सर्वाधिक वेळा स्टंप आऊट होण्याच्या बाबतीत कर्णधार रोहित शर्मा संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्मा आतापर्यंत एकूण 10 वेळा स्टंप आऊट झाला आहे. रोहित शर्माने टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनची बरोबरी केली आहे. त्याचवेळी सौरव गांगुली सर्वाधिक वेळा स्टंप झालेल्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, तो 15 वेळा स्टंप आऊट झाला होता.
पहिला डाव केवळ 109 धावांवर आटोपला
या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली, पण त्याला या संधीचा फायदा घेता आला नाही. टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ 33.2 षटकेच खेळता आली आणि 109 धावा झाल्या. टीम इंडियासाठी विराट कोहलीने पहिल्या डावात सर्वाधिक 22 धावा केल्या, तर या मालिकेत पहिल्यांदा खेळणाऱ्या शुभमन गिलने 21 धावांचे योगदान दिले. याशिवाय केएस भरत आणि उमेश यादव यांनी 17-17 धावांची खेळी केली. सध्याच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2023 10:11 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

