Mumbai 26/11 Terror Attack: विराट कोहलीने दहशतवादी हल्ल्याच्या 13 व्या वर्धापनदिना निमित्त शहीदांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाला- ‘हा दिवस कधीही विसरणार नाही’

मुंबईवर झालेल्या भयावह दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्षे पूर्ण झाली. मुंबईतील ताज हॉटेलसह इतर अनेक ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला नरसंहाराच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहे. 13 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ज्यांनी आपले प्राण गमावले होते त्यांचे स्मरण करत भारतीय क्रिकेट विराट कोहलीने ट्विटरवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

विराट कोहलीची शहीदांना वाहिली श्रद्धांजली (Photo Credit: Twitter, Instagram)

2008 मध्ये आजच्या दिवशी मुंबईतील (Mumbai) भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) ज्यांनी प्राण गमावले त्यांना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) श्रद्धांजली वाहिली आहे. “आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही, गमावलेले जीवन आम्ही कधीही विसरणार नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या मित्रांना आणि कुटुंबियांना माझ्या प्रार्थना पाठवत आहे,” विराटने ट्विट केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement