Mumbai Water Cut: मुंबई शहर पाणीकपात संदर्भात BMC द्वारे कारणांची मालिका, घ्या जाणून
मुंबई महापालिका क्षेत्रात पाणीकपात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर माहिती देताना महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे अवाहन केले आहे. सोबतच पाणी बचतीच्या टीप्स देताना पाणीकपात का सुरु आहे? याबाब कारणेही दिली आहेत
मुंबई महापालिका क्षेत्रात पाणीकपात सुरु आहे. या पार्श्वभूमीवर माहिती देताना महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे अवाहन केले आहे. सोबतच पाणी बचतीच्या टीप्स देताना पाणीकपात का सुरु आहे? याबाब कारणेही दिली आहेत. अर्थात ही कारणे काहीशी अधिकच असल्यामुळे एक मालिकाच तयार झाली आहे. घ्या जाणून काय म्हणते आहे मुंबई महापालिका.
-
- पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थितीच्या मर्यादा लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०२३ पासून वेगाने सुरु करण्यात आले आहे.
- मात्र, पर्यायी वितरण व्यवस्था व भौगोलिक परिस्थिती यांच्या मर्यादा लक्षात घेता पाणीपुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
- भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद केला आहे.
- ही बाब लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी व बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे शहरास होणाऱया प्रक्रियायुक्त पाणीपुरवठ्यात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्के कपात करण्यात येत आहे.
ट्विट
- असे असले, तरी पर्यायी जलवाहिन्यांद्वारे भांडूप संकुल जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचविण्यात येत आहे.
- हा पाणीपुरवठा करताना मुंबई शहर व उपनगरातील काही भागात, उंचावर राहणाऱ्या आणि पाणी वाटप क्षेत्राच्या टोकाकडील लोकवस्तीस १५ टक्क्यांपेक्षा जास्त, पाणीकपात जाणवू शकते.
- या भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वितरण व्यवस्था व महानगरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता यावर मर्यादा येत आहेत.
- त्यामुळे मुंबई शहर व उपनगरातील सर्व नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Advertisement
Advertisement
Advertisement