मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: जलसाठा पुन्हा 90% च्या पार; पहा आजची स्थिती
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. मात्र, पावसाची पुढील वाटचाल आणि साठ्यातील बदल यावर बीएमसीचे बारीक लक्ष राहणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा सध्या समाधानकारक पातळीवर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) हायड्रॉलिक इंजिनिअरिंग विभागाने जाहीर केलेल्या ताज्या अहवालातून समोर आले आहे. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार, या तलावांमधील एकूण उपयुक्त जलसाठा १३ लाख ६ हजार ३६४ दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचला असून, हे प्रमाण एकूण क्षमतेच्या ९०.२६ टक्के इतके आहे.
सध्या मोडक सागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून येथे १०० टक्के साठा नोंदवण्यात आला आहे. विहार तलावातही १०० टक्के साठा असल्याचे अहवालात नमूद आहे, तानसा तलावात ९९.१८ टक्के, तर तुळशी तलावात १०० टक्के उपयुक्त साठा आहे. मध्य वैतरणा तलावात ९३.७२ टक्के साठा नोंदवला गेला. तर अप्पर वैतरणा तलावात ८१.४५ टक्के, तर भातसा धरणात ८८.०७ टक्के साठा आहे.
कोणत्या तलावात किती साठा?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement