हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृत ​​महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नमस्कार न म्हणता वंदे मातरमने फोनवर संभाषण सुरू करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची घोषणा होताच आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच ही घोषणा केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)