मुंबईतील आजची तलावांची पाणीपातळी 4 ऑगस्ट: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, 7 जलाशयांमध्ये 89.54 टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही प्रमुख जलाशयांमध्ये आज सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८९.५४ टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. जल पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

Lake Levels in Mumbai Today:  मुंबई शहराला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील पाण्याच्या साठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजेपर्यंतच्या ताज्या अहवालानुसार, या सातही जलाशयांमध्ये एकूण ८९.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे जलसाठ्यात ही झपाट्याने सुधारणा झाली आहे. वाढत्या पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांना आगामी काळात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा विश्वास निर्माण झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement