India Hits Hard At China: चीनकडून प्रत्यक्ष सीमा रेषेवर अनेकदा शांतता भंग करण्याचा प्रयत्न, भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर
चीनने एप्रिल-मे 2020 पासून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (ministry of external affairs) सोमवारी आपला वार्षिक अहवाल २०२१-२२ सादर केला. यामध्ये मंत्रालयाने भारत आणि चीनमधील (China) द्विपक्षीय संबंधांचा उल्लेख केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची (LAC) स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न केला. असे प्रयत्न चीनकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे भारत-चीन द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला आहे. अहवालानुसार, चीनने एप्रिल-मे 2020 पासून पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे एलएसीवरील शांतता भंग झाली. चीनच्या या प्रयत्नांना भारताकडून नेहमीच जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर देण्यात आले, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पहा ट्विट -
India's engagement with China is 'complex' and Chinese attempts to unilaterally alter status quo along LAC in eastern Ladakh starting from April-May 2020 seriously disturbed peace, tranquility in border areas: MEA annual report
— Press Trust of India (@PTI_News) March 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 05:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

