शिवसेनेच्या खासदार Priyanka Chaturvedi यांनी दिला Sansad TV च्या अँकर पदाचा राजीनामा; निलंबनाच्या कारवाईनंतर उचलले पाऊल

राज्यसभेतील 12 सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. या मुद्द्यावर, अयोग्य वर्तनासाठी निलंबित केलेले सदस्य माफी मागण्यासही तयार नसताना यावर तोडगा कसा निघेल, असा सवाल शुक्रवारी सभागृह नेते पीयूष गोयल यांनी केला

शिवसेनेच्या खासदार Priyanka Chaturvedi यांनी दिला Sansad TV च्या अँकर पदाचा राजीनामा; निलंबनाच्या कारवाईनंतर उचलले पाऊल
प्रियंका चतुर्वेदी (फोटो सौजन्य-IANS)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित झाल्यानंतर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी रविवारी संसद टीव्हीवरील (Sansad TV Channel) कार्यक्रमाच्या अँकर पदाचा राजीनामा दिला. त्यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ’हे सांगण्यास अतिशय दुःख होत आहे की, मी संसद टीव्ही शो 'मेरी कहानी'चे अँकर पद सोडत आहे.’ अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या 12 राज्यसभा खासदारांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले होते. या 12 खासदारांमध्ये शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्या नावाचाही समावेश आहे.

खासदार प्रियंका चतुर्वेदी संसद टीव्हीवरील 'मेरी कहानी' या कार्यक्रमाच्या अँकर होत्या. 5 डिसेंबर रोजी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात खासदार चतुर्वेदी यांनी लिहिले, 'मनमानी कारभारामुळे माझे निलंबन झाले. त्याने प्रस्थापित संसदीय नियमांचे आणि नियमांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. माझा आवाज दाबण्यासाठी, माझ्या पक्षाचा आवाज चेंबरमध्ये रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. मला माझ्या संविधानाची प्राथमिक शपथ पूर्ण करण्यास नकार दिला जात असताना मी संसद टीव्हीवर काम करू शकत नाही.'

त्यांनी पुढे लिहिले की, 'या निलंबनामुळे माझ्या खासदारकीचा ट्रॅक रेकॉर्डही खराब झाला आहे. मला वाटते माझ्यावर अन्याय झाला आहे. पण अध्यक्षांच्या दृष्टीने ते न्याय्य असेल तर मला त्याचा आदर करावा लागेल.’ निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि सीपीआय आणि माकपच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. सध्या हे लोक संसदेच्या आतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर दिवसभर आंदोलन करत आहेत. (हेही वाचा: पंतप्रधानांनी कोट्यवधी भारतीयांच्या वेदना असंवेदनशीलतेच्या बुटाखाली चिरडू नका, प्रियांका गांधींची खोचक टीका)

राज्यसभेतील 12 सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. या मुद्द्यावर, अयोग्य वर्तनासाठी निलंबित केलेले सदस्य माफी मागण्यासही तयार नसताना यावर तोडगा कसा निघेल, असा सवाल शुक्रवारी सभागृह नेते पीयूष गोयल यांनी केला.

(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 06:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).