Sanjay Raut On UP Elections: यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे नामांकन नाकारल्याने शिवसेना नाराज, निवडणूक आयोगाकडे विचारणा करणार असल्याची संजय राऊतांची माहिती
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly elections) आपल्या काही उमेदवारांचे नामांकन नाकारल्याबद्दल शिवसेनेने (Shivsena) नाराजी व्यक्त केली असून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नेण्याचा निर्णय घेतला आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाला सांगितले.
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly elections) आपल्या काही उमेदवारांचे नामांकन नाकारल्याबद्दल शिवसेनेने (Shivsena) नाराजी व्यक्त केली असून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे (Election Commission) नेण्याचा निर्णय घेतला आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाला सांगितले. नोएडा, बिजनौर आणि मेरठमधील आमचे सहा ते सात अर्ज बेकायदेशीरपणे फेटाळण्यात आले आहेत. हे अत्यंत अन्यायकारक आहे कारण नामनिर्देशितांना आक्षेपांना उत्तर देण्याची परवानगी देखील दिली गेली नाही. सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे सांगत राऊत म्हणाले, शिवसेना हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेईल. ज्या उमेदवारांना आव्हान देण्यात आले आहे, अशा सर्व उमेदवारांनी मुदतीत कागदपत्रे दाखल केली आहेत, असे राऊत म्हणाले.
बिजनौरमधील एका उमेदवाराच्या नामांकनाचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आमच्या उमेदवारावर जे आक्षेप घेण्यात आले होते तेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विरोधात होते. तरीही त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. हा मुद्दा त्यांच्या बाजूने निकालात निघाला. दुर्दैवाने, बिजनौर, मेरठ आणि नोएडा येथील जिल्हा दंडाधिकार्यांनी सेनेच्या उमेदवारांना उत्तर देऊ दिले नाही. हेही वाचा Sanjay Raut On Kirit Somaiya: किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे आणि अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? संजय राऊत यांचा पलटवार
ते दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होते. सेनेकडे काही जागा जिंकण्याची किंवा भाजपच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या निकालाचे नुकसान करण्याची क्षमता असल्याचे सांगून राऊत म्हणाले, सत्ताधारी भाजप आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 403 विधानसभा जागांसाठी 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे.
राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटलाही प्रत्युत्तर दिले ज्यात त्यांनी म्हटले होते की, एका हिंदुत्ववादीने महात्मा गांधींची हत्या केली. राऊत म्हणाले, खर्या हिंदुत्ववादीने नि:शस्त्र महात्मा गांधींना नव्हे तर मोहम्मद अली जिना यांना गोळ्या घातल्या असत्या. स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी जीनांनीच केली होती. आजही संपूर्ण जग गांधींच्या निधनावर शोक करीत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)