Pune: कोरोना युद्धात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषद उभारणार स्मारक

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात पुण्यात 35 कोरोना योद्ध्यांचे प्राण गेले आहेत. कोविड-19 व्यवस्थापनात गुंतलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि इतरांच्या समर्पित सेवेमुळे राज्यात अनेकांचे प्राण वाचले आहेत.

Pune: कोरोना युद्धात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे जिल्हा परिषद उभारणार स्मारक
Medical workers (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोना युद्धात प्राण गमावलेल्या जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्यांचे स्मारक उभारले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी कोविड-19 साथीच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. प्राण गमावलेल्या 35 जवानांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे 35 लोक हॉस्पिटलमध्ये तैनात होते आणि कोरोनाच्या काळात लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यात मदत करत होते.

अशाप्रकारे कोरोना योद्ध्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही व येथील जनता वीरांचे बलिदान कायम स्मरणात ठेवेल, असे परिषदेने सांगितले. प्रसाद म्हणाले, सशस्त्र दल आणि पोलीस दलात हुतात्मा स्मारके आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ही योजना आखण्यात आली आहे. डिझाइनला औपचारिक रूप देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी सरकारी जमिनीचा वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व विभागांकडून परवानगी घेण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात पुण्यात 35 कोरोना योद्ध्यांचे प्राण गेले आहेत. कोविड-19 व्यवस्थापनात गुंतलेले डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, शिक्षक आणि इतरांच्या समर्पित सेवेमुळे राज्यात अनेकांचे प्राण वाचले आहेत. प्रसाद म्हणाले, या स्माराकाद्वारे साथीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची मेहनत आणि वचनबद्धता व्यर्थ जाणार नाही. (हेही वाचा: कुर्ला परिसरात अग्नितांडव! इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा खिडकीतून खाली उतरण्याचा प्रयत्न; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ)

दरम्यान, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. एक दिवसापूर्वीच्या तुलनेत आज सक्रिय प्रकरणे 29,251 आहेत. दैनिक सकारात्मक दर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे 5 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत लसीचे 218 कोटी 93 लाख 14 हजार 422 डोस देण्यात आले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2022 09:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).