उत्तर भारतीयांमुळेच मुंबई चालते, त्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र ठप्प- संजय निरुपम

उत्तर भारतीयांनी एक दिवस ठरवलं तरी मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी काम बंद केलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो.

संजय निरुपम (Photo Credits: PTI)

उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात. त्यांनी काम बंद केल्यास मुंबई ठप्प होईल, असं वादग्रस्त विधान मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे. नागपूरमधील उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यापर्यंत अशी सर्व कामं उत्तर भारतीयच करतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तर भारतीय सक्रीय आहेत. रिक्षा-टॅक्सी चालवणं, फळं-भाज्या विकणं अशी कामे उत्तर भारतीयांच्या अखत्यारीत आहेत. त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणूनही उत्तर भारतीयांचे प्रमाण अधिक आहे. सर्व क्षेत्रात उत्तर भारतीयांनी वर्णी लावली आहे. हीच माणसं मुंबई चालवतात. त्यामुळे त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. उत्तर भारतीयांनी एक दिवस ठरवलं तरी मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी काम बंद केलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करायला आम्हाला भाग पाडू नका, असा अप्रत्यक्ष इशारा संजय निरुपम यांनी बोलताना दिला.

इतक्यावरच ते थांबले नाही तर पुढे ते म्हणाले की, "उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहेत. पण एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचे आहे."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Maharashtra Liquor Shop Policy: गृहनिर्माण सोसाट्यांच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये बिअर, दारूची दुकानं सुरू करण्यासाठी सोसायटीची NOC आवश्यक - राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांचा नवा नियम

Sant Tukaram Maharaj Beej Sohala: संत तुकाराम महाराज बीज सोहळा निमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल; घ्या जाणून

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिक मध्ये? गंगापूर रोड भागात पाहिल्याचा स्थानिकांचा दावा

Advertisement

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार तरी केव्हा? वरुण सरदेसाई यांच्या प्रश्नास आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले?

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement