Mumbai: बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलीस वांद्रे स्थानकाबाहेर ठेवणार पाळत

वांद्रे स्थानकाबाहेरील ऑटोरिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai Police (PC - Twitter)

Mumbai: बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वांद्रे स्थानकाबाहेर (Bandra Station) काही दिवस लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहनचालकांना वाहतुकीचे उल्लंघन करून स्थानकाभोवती गोंधळ घालू नये, असा इशारा देण्यात आला आहे. @SriJainMahajan ट्विटर वापरकर्त्यानुसार, पुढील काही दिवस वांद्रे स्थानकाबाहेर पोलिस कडक नजर ठेवणार आहेत.

वांद्रे स्थानकाबाहेरील ऑटोरिक्षांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे मुंबई पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येत असतानाच ही बातमी समोर आली आहे. (हेही वाचा -Kolhapur: कोल्हापूरातील प्राध्यापकाला पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणं पडलं महागात; न्यायालयाने फेटाळली गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील याचिका)

शाह यांच्या मुंबई दौऱ्यापूर्वी, मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते हाजी अली या दरम्यान 15 एप्रिल रोजी संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होईल.

दरम्यान, 15 एप्रिल रोजी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ - विलेपार्ले - वांद्रे वरळी सीलिंक - वरळी - हाजी अली - गिरगाव चौपाटी दरम्यान संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. नागरिकांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे," असे आवाहन मुंबई वाहतूक विभागाने केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement