वर्धा: पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला-बाहुलीचे लग्न; पहा फोटोज
उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या महाराष्ट्राला आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात.
उन्हाने तापलेल्या आणि त्रासलेल्या महाराष्ट्राला आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या प्रथा, परंपरा असतात. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एका गावात पाऊस पडावा म्हणून चक्क बाहुला-बाहुलीचे लग्न लागवण्यात आले. राज्यात विदर्भात दुष्काळ असून वर्धा जिल्हा या त्यापैकी एक आहे.
विधीवत आणि परंपरेने पार पडललेल्या या लग्नसोहळ्याचे काही फोटोज एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केले आहेत.
ANI ट्विट:
Maharashtra: Locals of a village in Wardha organised a wedding of two dolls for rainfall. Vidarbha region of the state is reeling under drought, Wardha district is a part of this region. (June 21) pic.twitter.com/qKPvgouOip
— ANI (@ANI) June 22, 2019
या लग्नाबद्दल गावकरी म्हणतात की, "दुष्काळामुळे गावातील 22 मुलगे आणि 2 लग्नाळू मुलींची लग्न होत नसल्याने आम्ही बाहुला-बाहुलीचे लग्न करण्याचे ठरवले."
Villagers say,"due to drought around 22 boys and 2 girls of marriageable age are not being married. So we have organised this wedding ceremony of dolls." #Maharashtra (June 21) pic.twitter.com/W933NoG73e
— ANI (@ANI) June 22, 2019
महाराष्ट्रातील कोकणात मान्सूनने हजेरी लावली असून येत्या 24 तासांत मान्सून राज्याच्या काही भागात सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 22, 2019 07:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

