Mumbai: मुंबईत मानसिक अस्वस्थ असलेल्या व्यक्तीने भरदिवसा शेजाऱ्यांवर केला चाकूने हल्ला; 3 जणांचा मृत्यू, आरोपीला अटक

काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. शेजाऱ्यांमुळेच हा सर्व प्रकार घडल्याचे आरोपींना वाटले. या रागात हल्लेखोराने शेजाऱ्यांवर हल्ला केला.

Mumbai: मुंबईत मानसिक अस्वस्थ असलेल्या व्यक्तीने भरदिवसा शेजाऱ्यांवर केला चाकूने हल्ला; 3 जणांचा मृत्यू, आरोपीला अटक
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Mumbai: शुक्रवारी दक्षिण मुंबईतील (Mumbai) एका निवासी इमारतीत एका 54 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याने तिघांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना ग्रँट रोडवरील पार्वती मॅन्शन येथे दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

काही महिन्यांपूर्वी आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला सोडून दिल्याचे सांगण्यात येत आहे. शेजाऱ्यांमुळेच हा सर्व प्रकार घडल्याचे आरोपींना वाटले. या रागात हल्लेखोराने शेजाऱ्यांवर हल्ला केला. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना घडलेल्या इमारतीचा संपूर्ण मजला पोलिसांनी सील केला आहे. ग्रँट रोडवरील पार्वती मॅन्शनमध्ये ही घटना घडली. (हेही वाचा - Thane Crime: भिवंडीत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा)

या घटनेतील जखमींना गिरगावातील खासगी रुग्णालयात आणि महापालिका संचालित नायर रुग्णालयात नेण्यात आले. जेथे जयेंद्र मिस्त्री (77), त्यांची पत्नी इलाबेन मिस्त्री (70) आणि जेनिल ब्रह्मभट्ट (18) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय घरकामगार प्रकाश वाघमारे (53) आणि स्नेहल ब्रह्मभट्ट (44) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, डीबी मार्ग पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2023 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).