IIT Bombay मधील 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांचा हल्ला
आयआयटी मुंबई येथे इंटर्नशीप करणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांनी हल्ला केल्याची घटना समोर येत आहे.
आयआयटी मुंबई (IIT Bombay) येथे इंटर्नशीप करणाऱ्या एका 21 वर्षीय विद्यार्थ्यावर बैलांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (11 जुलै) रोजी हा विद्यार्थी मोबाईलमध्ये बघत उभा असताना अचानक आलेल्या दोन बैलांनी त्याला धडक दिली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अक्षय पी.एल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मोबाईलमध्ये बघत उभा होता. अचानक आलेल्या दोन बैलांनी त्याला काही कळायच्या आत धडक दिली. त्यानंतर अक्षय जमिनीवर कोसळला. इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रथम त्याला आयआयटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर विक्रोळी येथील सुशुश्रा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेत अक्षयच्या पोटाला जखम झाली असून आता मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे. तसंच पोटाच्या आत कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement