Mumbai-Pune Expressway Traffic: मुसळधार पाऊस; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

कॅनडातील G7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोकरा घोडा, मधुबनी आणि वारली चित्रे यासारख्या पारंपारिक भारतीय कलाकृती आणि बांबूच्या कलाकृती जागतिक नेत्यांना भेट दिल्या, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवून आणि द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन दिले.

Mumbai-Pune Expressway (Photo Credit- X)

Yashwantrao Chavan Expressway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway Jam), जो अधिकृतपणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे म्हणून ओळखले जातो. हा मार्ग गुरुवारी (19 जून) मोठ्या वाहतूक कोंडीमळे ठप्प झाला. मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचा फटका बसल्याने रस्तेवाहतूक आणि दळणवळणास मोठा फटका बसला. परिणामी हा मार्ग पूर्ण ठप्प झाला. मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. अनेक व्हिडिओंमध्ये दावा केला जात आहे की, अनेक चारचाकी छोटी वाहने आणि ट्रक एक किलोमीटरहून अधिक लांब रांगेत अडकलेले आहेत.

कोकण आणि पश्चिम घाटात दमदार पावसाची शक्यता

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम घाट, मुंबई आणि पुणे या भागांमध्ये दिवसभरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे एक्सप्रेसवेवर दृश्यमानता कमी झाली असून वाहनचालकांनी सावधगिरीने आणि मंदगतीने वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक राजधानीत मुसळधार: मुंबईत सुमारे 70 मिमी पाऊस होण्याची शक्यता असून, पुण्यात मागील 24 तासांत तब्बल 221 मिमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या जोरदार पावसामुळे प्रवासी आणि वाहनचालकांचे हाल झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

रायगडमध्ये शाळांना सुट्टी: IMD ने 19 जूनपासून 22 जूनपर्यंत मुंबई, पुणे, कोकण आणि इतर भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

वाहतूक कोंडीवर प्रवासी नाराज

दैनंदिन प्रवासी आणि नियमित वाहनचालकांनी या कोंडीबाबत वाहतूक व्यवस्थापनाच्या हलगर्जीवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने X वर लिहिले, 'हे रस्ता नेहमीच ट्रक आणि वाहतुकीच्या शिस्तीअभावी अडकलेले असते. ट्रॅफिक पोलीस काहीच करत नाहीत. अत्यंत वाईट व्यवस्थापन.' तर दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, कोंडी पुणेच्या दिशेच्या मार्गावर आहे आणि ही नेहमीचीच बाब आहे. त्यामुळे काही नवीन किंवा धोकादायक नाही, असंच वाटतं."

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा वाहतुकीचा मार्ग असून, अशा प्रकारच्या कोंड्यांमुळे दररोज हजारो प्रवाशांच्या प्रवासात अडथळे निर्माण होतात. प्रशासनाकडून अजून पर्यायी मार्ग किंवा विशेष वाहतूक नियोजनाची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement