Devendra Fadnavis On Cybercrime: सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र टाकणार नवे पाऊल- देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात सायबर (Cybercrime) गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लवकरच एक नवे पाऊल टाकत आहे. जेणेकरुन सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते शुक्रवारी (13 जानेवारी) पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रात सायबर (Cybercrime) गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लवकरच एक नवे पाऊल टाकत आहे. जेणेकरुन सायबर गुन्ह्यांना आळा बसेल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. ते शुक्रवारी (13 जानेवारी) पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगिले की, येत्या काळात रस्त्यावरील गुन्हे कमी होतील पण आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांसारखे पांढरपेशी गुन्हे नक्कीच वाढतील.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) फारसे काम नव्हते पण तुम्हाला ते वाढलेले दिसेल. येत्या काही दिवसांत ईओडब्ल्यूकडे इतरांच्या तुलनेत कामाचा भार जास्तीत वाढला जाईल कारण सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्र सरकारही सायबर कायद्यात बदल करत आहे आणि त्याच बरोबर राज्य सरकारही सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी नवनवीन कल्पना आणत आहे, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Cyber Fraud च्या नव्या अंदाजाची National Crime Investigation Bureau कडून माहिती; 'या' पासून रहा सावध)
सायबर क्राइम प्रकरणांच्या अधिकारक्षेत्रात होत असलेल्या दीर्घ विलंबाकडे लक्ष वेधून फडणवीस म्हणाले, "या व्हाईट कॉलर गुन्ह्यांचा मुख्य मुद्दा म्हणजे अधिकारक्षेत्र आहे. राज्य सरकार सर्व भागधारकांना एका व्यासपीठावर आणत आहे, सर्व वित्तीय संस्था, एनबीएफसी, बँका आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकत्रित केले जातील, त्यामुळे विशिष्ट ऑनलाइन गुन्ह्यांना प्रतिसाद वेळ कमी करता येईल.
ट्विट
Maharashtra to come up with new ideas in tackling increasing cybercrime: Devendra Fadnavis
Read @ANI Story | https://t.co/b1N3Wu5Ff2#Maharashtra #DevendraFadnavis #Cybercrime pic.twitter.com/WHEbikieg0
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2023
सायबर गुन्हे रोखण्याबाबत एक उदाहरण देत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "क्रेडिट कार्डचा गैरवापर झाल्यास फसवणूक झालेली रक्कम पुढील 15 ते 20 मिनिटांतच थांबविली जाऊ शकते. अन्यथा पैसे शेवटी परदेशात पोहोचतात, त्यासाठी गुन्हेगार बँकांमध्ये सर्फिंग करतात. त्यामुळे, सर्फिंगचा वे कमी करण्यासाठी प्रतिसादाची वेळ सर्वात महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही एक अशी प्रणाली तयार करत आहोत जी देशातील सर्वोत्तम असेल आणि सर्व पोलिस ठाण्यांना सायबर क्राईम प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी आधुनिकीकरण करू. ही प्रणाली निविदा टप्प्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता पूर्ण झाली आहे. हे एक अद्वितीय मॉडेल आणि आर्थिक गुन्हेगारी आणि वाढती सायबर सुरक्षा हाताळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल, ”फडणवीस पुढे म्हणाले
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2023 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

