Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधींना राम मंदिराच्या दर्शनासाठी बोलवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

शहा यांच्या वक्तव्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पत्रकारांना सांगितले की, राहुल गांधींना राम मंदिराच्या दर्शनासाठी बोलावले जाईल.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधींना राम मंदिराच्या दर्शनासाठी बोलवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराला (Ram Temple) भेट देण्यासाठी आमंत्रित केले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राहुल यांच्यावर हल्लाबोल करत 1 जानेवारी 2024 पर्यंत भव्य राम मंदिर तयार होईल, अशी घोषणा केल्यानंतर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे हे विधान आले आहे. शहा यांच्या वक्तव्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पत्रकारांना सांगितले की, राहुल गांधींना राम मंदिराच्या दर्शनासाठी बोलावले जाईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी गुरुवारी त्रिपुरातील सबरूम येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले होते, राहुल सबरूमकडून ऐका, 1 जानेवारी 2024 पर्यंत भव्य राम मंदिर तयार होईल. हेही वाचा Mumbai: मुंबईत सेंट मायकल चर्चमध्ये क्रॉसची तोडफोड, राष्ट्रवादीने केली कारवाईची मागणी

मध्य प्रदेशच्या जलसंधारणावरील राज्यमंत्र्यांच्या पहिल्या अखिल भारतीय वार्षिक परिषदेत भाग घेण्यासाठी फडणवीस भोपाळला आले होते. येथे अमित शहा यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राहुल गांधींना अचानक जुन्या गोष्टी आठवतात. दहा वर्षांपूर्वी त्यांनी काय विचारायला हवे होते, ते आज विचारत आहे. अयोध्येत राम मंदिराचे काम जोरात सुरू आहे. मंदिर उभारणीनंतर राहुल गांधींनाही दर्शनासाठी बोलावण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश दौऱ्यावर असताना जलसंधारणाच्या बाबतीत शिवराज सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, जलसंधारणाच्या बाबतीत मध्य प्रदेशने खूप चांगले काम केले आहे. यातून आम्हालाही खूप काही शिकायला मिळाले. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर मध्य प्रदेशात सिंचन क्षेत्रात केलेली कामे महाराष्ट्रात राबवली. त्यामुळे महाराष्ट्रातील रब्बी पिकांचे उत्पादन दुप्पट झाले. हेही वाचा Mumbai Local Update: मागील वर्षात मध्य, पश्चिम रेल्वे झोनमध्ये अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर करण्याऱ्या 8,176 लोकांना पकडले, 55.86 लाख रुपयांचा दंड केला वसूल

दोन राज्यांमधील पाणी वादाबाबत फडणवीस म्हणाले की, कोणताही वाद नाही.  आम्ही आमच्या वाट्याचे पाणी घेत आहोत. दोन्ही राज्यात योग्य समन्वय आहे. यावर निर्णय घेणारी संयुक्त समिती आहे. फडणवीस म्हणाले की, आम्ही मध्य प्रदेशसह ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पावर काम करत आहोत. याचा फायदा दोन्ही राज्यांना होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).