India-Italy Agreement: भारत दरवर्षी 20,000 हून अधिक कामगार इटलीला पाठवणार; मंत्रिमंडळाने कराराला दिली मंजुरी

या करारामुळे ज्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अल्पकालीन व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांना 12 महिन्यांपर्यंत इटलीमध्ये राहण्याची परवानगी मिळते.

India-Italy Agreement (संग्रहित संपादित प्रतिमा)

India-Italy Agreement: युरोपचे प्रवेशद्वार असलेल्या इटलीने (Italy) भारतीयांसाठी दरवाजे उघडले आहेत. भारत आणि इटलीने अलीकडेच स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार दोन्ही देशांतील लोकांमधील संबंध दृढ करण्यासाठी, विद्यार्थी आणि कुशल कामगारांना पाठिंबा देण्यासाठी, व्यावसायिक लोक आणि तरुण व्यावसायिकांची गतिशीलता सुधारण्यासाठी आणि अनियमित स्थलांतराशी संबंधित समस्यांवर सहकार्य करण्याचे एक साधन असेल.

या अंतर्गत इटलीमध्ये शिक्षण किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तात्पुरत्या निवासाची परवानगी दिली जाईल, ज्यामुळे त्यांना इटलीमध्ये विविध क्षेत्रातील अनुभव मिळविण्याची संधी मिळेल. अशाप्रकारे या कराराद्वारे भारतीयांना त्यांच्या अभ्यासानंतर इटलीमध्ये संधी, इंटर्नशिप आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. कामगारांची कमतरता भरून काढण्यासाठी आणि दोन्ही देशांतील लोकांमधील संपर्क वाढवण्यासाठी इटली सरकारने भारतासोबत हा करार केल्याचे मानले जात आहे.

यासोबतच कामगारांसाठी राखीव कोटाही निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे बिगर हंगामी आणि हंगामी कामगारांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. या करारानुसार हंगाम आणि बिगर हंगामासाठी भारतीय कामगारांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. बिगर हंगामी कामगारांसाठी, इटलीने सन 2023 साठी 5 हजार, वर्ष 2024 साठी 6 हजार आणि वर्ष 2025 साठी 7 हजारांचा कोटा निश्चित केला आहे. बिगर हंगामी कामगारांसाठी एकूण राखीव कोटा 12 हजार निश्चित करण्यात आला आहे, तर हंगामी कामगारांचा एकूण कोटा आठ हजार निश्चित करण्यात आला आहे. अशाप्रकारे मंत्रिमंडळाने दरवर्षी 20,000 हून अधिक भारतीय कामगार पाठवण्याच्या इटलीसोबतच्या कराराला मंजुरी दिली. (हेही वाचा: Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या उद्घाटनामुळे अर्थव्यवस्थेला मिळेल चालना; देशात अंदाजे 50,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता- CAIT)

या करारामुळे ज्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अल्पकालीन व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांना 12 महिन्यांपर्यंत इटलीमध्ये राहण्याची परवानगी मिळते. भारताने आतापर्यंत डेन्मार्क, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल आणि इतर अनेक देशांशी असे करार केले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement