Army constructs First Bridge: पुरानंतर उत्तर सिक्कीमला मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी लष्कराने बांधला पहिला पूल

तीस्ता नदीची रुंदी 600 फूट वाढल्याने आणि त्यामध्ये 160 फूट बेट असलेल्या दोन नाल्यांसोबत पाणी वाहत असल्याने दोन स्वतंत्र पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

Army constructs First Bridge: पुरानंतर उत्तर सिक्कीमला मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी लष्कराने बांधला पहिला पूल

भारतीय सैन्याने, 4 ऑक्टोबरच्या अचानक आलेल्या पुरानंतर उत्तर सिक्कीमला पुन्हा जोडण्याच्या प्रयत्नात, सांकलांग-थेंग-चुंगथांग मार्गावरील तीस्ता नदीवरील बेली ब्रिजचे बांधकाम पूर्ण केले आहे. या मार्गावरील दुसऱ्या पुलाचे काम अद्याप सुरू आहे. उत्तर सिक्कीममधील मंगनच्या पुढे असलेले क्षेत्र 4 ऑक्टोबरच्या अचानक आलेल्या पुरामुळे खंडित राहिले आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) देखील मुख्य मार्ग - मंगन-तुंग-चुंगथांगला पुन्हा जोडण्याचे काम करत आहे. मंगन - संकलांग - थेंग - चुंगथांग - पर्यायी मार्गाने चुंगथांग पर्यंत संपर्क पूर्ववत करण्यासाठी तात्काळ दिलासा म्हणून भारतीय लष्कराचे जवान दोन पूल बांधत आहेत. (हेही वाचा - New Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! मॉलमधून अमेरिकेतील लोकांना टार्गेट करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

पाहा पोस्ट -

तीस्ता नदीची रुंदी 600 फूट वाढल्याने आणि त्यामध्ये 160 फूट बेट असलेल्या दोन नाल्यांसोबत पाणी वाहत असल्याने दोन स्वतंत्र पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. 150 फूट लांबीचा पहिला पूल लष्कराने रविवारी बांधला. दुसऱ्या पुलाचे काम 27 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

उत्तर सिक्कीमला पुन्हा जोडण्यासाठी बीआरओ आणि नागरी प्रशासन आणि स्थानिकांच्या सहाय्याने भारतीय लष्कराच्या तुकड्या मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन करत आहेत, असे एका अधिकाऱ्याने पुनर्बांधणीच्या कामावर सांगितले. 4 ऑक्टोबरच्या पहाटे सिक्कीमला आलेल्या तिस्ता नदीला आलेल्या महापुराने राज्य आणि शेजारील उत्तर पश्चिम बंगालमध्ये किमान 78 लोकांचा मृत्यू झाला.

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2023 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).