Corona Vaccination In India: भारतातील कोविड 19 लसीकरणाने ओलांडला 105 कोटींचा टप्पा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी दिली माहिती

भारतातील कोविड 19 लसीकरण (Vaccination) कव्हरेजने शुक्रवारी 105 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 51 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. आज अंतिम अहवाल आल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

Corona Vaccination In India: भारतातील कोविड 19 लसीकरणाने ओलांडला 105 कोटींचा टप्पा, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी दिली माहिती
Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोविड 19 लसीकरण (Vaccination) कव्हरेजने शुक्रवारी 105 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 51 लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. आज अंतिम अहवाल आल्यानंतर दैनंदिन लसीकरणाची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia) यांनी शुक्रवारी ट्विट केले की, देशात आतापर्यंत 105 कोटी कोरोना लसीचे उपचार करण्यात आले आहेत. याच महिन्यात 21 ऑक्टोबर रोजी भारताने 100 कोटी लसीकरणाचा आकडा पूर्ण केला होता. भारताने केवळ 10 महिन्यांत अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. सुमारे 130 कोटी लोकसंख्येमध्ये कोरोना लसीचे 100 कोटी लसीकरण डोस ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे.

भारताच्या या यशाने जगाला धक्का बसला आहे. भारताने आपल्या देशातील लोकांना तसेच जगातील इतर देशांना लसीचे करोडो डोस दिले आहेत. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कोरोना लसीकरणात खराब कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोविड19 चे घरोघरी लसीकरण करण्यासाठी पुढील महिन्याभरात 'हर घर दस्तक' मोहीम सुरू केली जाईल. ते म्हणाले की प्राणघातक विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना संपूर्ण लसीकरणासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत राष्ट्रीय आढावा बैठकी दरम्यान मांडविया म्हणाले की, कोणताही जिल्हा असा राहू नये जेथे संपूर्ण लसीकरण नाही. ते म्हणाले की, हर घर दस्तक मोहीम लवकरच खराब कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांमध्ये लोकांना पूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी सुरू होईल. हेही वाचा PM CARES Fund: दिल्ली उच्च न्यायालयात पीएम केयर फंड संबंधित याचिकेवर 18 नोव्हेंबरला सुनावणी

मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना धन्वंतरी जयंतीच्या मुहूर्तावर 2 नोव्हेंबर रोजी मोहीम सुरू करण्याची सूचना केली. असे सुमारे 48 जिल्हे ओळखण्यात आले आहेत. जेथे पात्र लाभार्थ्यांपैकी 50% पेक्षा कमी लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रत्येकाला कोरोनाचा पहिला डोस मिळावा, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 11:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).