GT vs MI, Chandigarh Weather Forecast: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स एलिमिनेटर सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

चंदीगडमधील या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान तापमान 32 ते 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे की नाही? जाणून घेऊयात.

GT vs MI, Chandigarh Weather Forecast: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स एलिमिनेटर सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरचे हवामान कसे आहे? जाणून घ्या
Photo Credit- X

Mumbai Indians vs Gujarat Titans IPL 2025 Chandigarh Weather Report: गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) 30 मे शुक्रवारी रोजी आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात एकमेकांसमोर येतील. ही रोमांचक लढत महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड, मुल्लानपूर येथे खेळली जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु संघात असे अनेक मोठे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कोणतीही कठीण परिस्थिती बदलण्याची क्षमता आहे. गुजरातसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. सामना जिंकून क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवण्याच्या आशेने संघ मैदानात उतरेल.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची स्पर्धेत सुरुवाती काहीशी खराब झाली. मात्र, संघाने दमदार पुनरागमन केले. लीग टप्प्यात सलग सहा सामने जिंकले आणि पॉइंट टेबलमध्ये चौथे स्थान मिळवले. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई संघाला नॉकआउट सामन्याचा प्रचंड अनुभव आहे. मुंबईचा संघ या अनुभवाचा फायदा घेईल आणि गुजरातला हरवून क्वालिफायर 2 मध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल.

चंदीगड हवामान अहवाल (Chandigarh Weather Report)

आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात, गुजरात टायटन्स (जीटी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चंदीगडमधील या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा आनंद घेता येईल. सामन्यादरम्यान तापमान सुमारे 32 ते 28 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. या हंगामात नवीन पीसीए (पंजाब क्रिकेट असोसिएशन) स्टेडियमच्या खेळपट्टीने फलंदाजांना खूप मदत केली आहे. गोलंदाजांनीही आपली भूमिका बजावली असली तरी, हे मैदान मोठी धावसंख्या असलेल्या सामन्यांसाठी ओळखले जाते. सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची होऊ शकते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 3902 05:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).