IPL 2020 Update: UAE मध्ये आयपीएल झाल्यास विराट कोहलीच्या RCBच्या जिंकण्याची शक्यता वाढवू शकेल, आकाश चोपडा यांनी सांगितले 'हे' कारण

आयपीएल 13 युएईमध्ये खेळल्यास विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) सर्वात मोठा फायदा होईल असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोपडा यांनी युएईची परिस्थिती भारताच्या तुलनेत कशी वेगळी नाही आणि कोरड्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना कसा फायदा होण्याची शक्यता आहे हे सांगितले.

IPL 2020 Update: UAE मध्ये आयपीएल झाल्यास विराट कोहलीच्या RCBच्या जिंकण्याची शक्यता वाढवू शकेल, आकाश चोपडा यांनी सांगितले 'हे' कारण
File image of RCB players (Photo Credits: IANS)

आयसीसीने (ICC) सोमवारी अखेर टी -20 वर्ल्ड कप 2020 पुढे ढकलला जो यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जात होता. यामुळे त्या विंडोमध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 13 चे आयोजित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएलची पुढील आवृत्ती भारतातून बाहेर पडण्याची शक्यता असून युएईमध्ये (UAE) या स्पर्धेचे आयोजन होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. आयपीएल (IPL) 13 साठी बीसीसीआयने 26 सप्टेंबर ते 07 नोव्हेंबर या कालावधीत तात्पुरती वेळापत्रक निश्चित केले आहे. बीसीसीआयला आता भारत सरकारच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनीही मंगळवारी बीएसीआय भारत सरकारशी यूएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी मंजुरी मिळवण्यासाठी चर्चा करीत असल्याचे म्हणतया बातमीला दुजोरा दिला. दरम्यान, आयपीएल 13 युएईमध्ये खेळल्यास विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) सर्वात मोठा फायदा होईल असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी व्यक्त केले. (IPL 2020 Update: लवकरच होणार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक, BCCI करणार भारत सरकारशी चर्चा, जाणून घ्या पूर्ण प्लान)

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोपडा यांनी युएईची परिस्थिती भारताच्या तुलनेत कशी वेगळी नाही आणि कोरड्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना कसा फायदा होण्याची शक्यता आहे हे सांगितले. तथापि, आरसीबीसारख्या (RCB) संघांना बऱ्याच त्यांच्या कमकुवत गोलंदाजीच्या हल्ल्याशी झुंज देण्यास मदत होईल अशी मोठी सीमा असल्याचे त्यांनी मानले. “फलंदाजीच्या परिस्थितीवर फारसा परिणाम होणार नाही. आरसीबी उदाहरणार्थ, कारण जेव्हा मैदाने मोठी असतात तेव्हा तुमची बॉलिंग कमकुवत असली तरीही ती उघडकीस येत नाही. आरसीबी खरोखर चांगले काम करेल,” चोपडा म्हणाले.

भारताच्या तुलनेत युएईच्या परिस्थितीत खेळाडूंसाठी मोठा फरक पडणार नाही, परंतु चोपडा यांना वाटते की उष्णतेमुळे काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. युएईमध्ये खेळताना खेळाडूंसमोर डिहायड्रेशन, ही मोठी समस्या असू शकते, परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तापमान नियंत्रणात राहणे अपेक्षित आहे. “उष्णतेमुळे त्यांना थोडासा संघर्ष करावा लागला असला तरी हरकत नाही. सध्या हवामान चांगले आहे. निष्पक्षपणे म्हटले तर युएईमध्ये खूप उष्णता असते,” चोपडा म्हणाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement