IND A vs UAE, T20 Emerging Teams Asia Cup 2024 Scorecard: भारत अ संघाने युएईला 107 धावांवर रोखले, रसिक दार सलामचे 3 विकेट
टीम इंडियासाठी सर्वात प्रभावी गोलंदाज रसिक सलाम होता, ज्याने 3 षटकात 15 धावा देऊन 3 बळी घेतले. याशिवाय रमणदीप सिंगनेही 7 धावांत 2 बळी घेतले. भारत अ च्या गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला,
India A National Cricket Team vs UAE National Cricket Team Match Scorecard: भारतीय अ राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2024 चा आठवा सामना अल अमेरत क्रिकेट ग्राउंड, मिनिस्ट्री टर्फ 1, अल अमेरत येथे सुरु आहे, ज्यामध्ये UAE ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही कारणझाला. भारत अ संघाला 20 षटकांत विजयासाठी 108 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. यूएईच्या फलंदाजीची सुरुवात खूपच खराब झाली. पण राहुल चोप्राने एका टोकाला धरून 50 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. (हेही वाचा - IND A vs UAE, T20 Emerging Teams Asia Cup 2024 Live Toss Update: संयुक्त अरब अमीरातीने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, भारतीय A संघ गोलंदाजी करणार, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग 11 )
संघाने झटपट विकेट गमावल्या आणि 11 धावांतच दोन्ही सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले. वैभव अरोराच्या चेंडूवर निशांत सिंधूकडे झेल दिल्यानंतर सलामीवीर आर्यांश शर्माने केवळ 1 धाव घेत आपली विकेट गमावली. त्याचा सहकारी मयंक राजेश कुमारने 10 धावा केल्या, मात्र अंशुल कंबोजच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. यूएईचे फलंदाज निलांश केसवानी आणि विष्णू सुकुमारन हेही मधल्या फळीत फार काळ टिकू शकले नाहीत आणि एका वेळी संघाची धावसंख्या 35/4 होती. मात्र, राहुल चोप्राने एका टोकाला धरून 50 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता, परंतु तो एकट्याने संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेऊ शकला नाही. कर्णधार बासिल हमीदने 12 चेंडूत 22 धावांची जलद खेळी खेळली, मात्र तो बाद झाल्यानंतर यूएईचा डाव गडगडला.
टीम इंडियासाठी सर्वात प्रभावी गोलंदाज रसिक सलाम होता, ज्याने 3 षटकात 15 धावा देऊन 3 बळी घेतले. याशिवाय रमणदीप सिंगनेही 7 धावांत 2 बळी घेतले. भारत अ च्या गोलंदाजांनी यूएईच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला, त्यामुळे ते मोठे फटके खेळू शकले नाहीत आणि विकेट पडत राहिल्या. यूएईच्या 107 धावांच्या प्रत्युत्तरात भारत अ संघाला विजयासाठी 20 षटकात केवळ 108 धावा करायच्या आहेत, जे एक सोपे लक्ष्य असल्याचे दिसते. आता यूएईच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल जेणेकरून ते भारत अ संघाला हे छोटे लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकतील.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 5643 05:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

