Arvind Kejriwal on CAA: 'भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण पाकिस्तानमधून येणाऱ्या मुलांना नोकऱ्या द्यायला तयार' - अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर (CAA) भाजपवर निशाणा साधला आहे.  सरकारला भारतात पाकिस्तानींचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणून त्यांनी सीएए आणल्याचं, केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

Photo Credit - Twitter

Arvind Kejriwal on CAA: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal)यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की सीएएच्या माध्यमातून बांगलादेश ( Bangladesh), पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan)मधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) दिले जाईल. म्हणजे त्यांना भारतात नोकऱ्या दिल्या जातील, त्यांच्यासाठी घरेही बांधली जातील. भाजप आमच्या मुलांना नोकऱ्या देऊ शकत नाही, पण पाकिस्तानातून येणाऱ्या मुलांना त्यांना नोकऱ्या (Job) द्यायच्या आहेत. आधीच आमचे बरेच लोक बेघर आहेत, पण भाजपला पाकिस्तानातून आलेल्या लोकांना इथे स्थायिक करून घ्यायचे आहे, त्यांचा विकास करायचा आहे. भारत सरकारचा पैसा आमच्या कुटुंबासाठी न वापरता पाकिस्तानींच्या बंदोबस्तासाठी वापरचा आहे. (हेही वाचा : Delhi CM Arvind Kejriwal 8 समन्सनंतर पहिल्यांदाच ED ला उत्तर देण्यास तयार; समोर ठेवली 'ही' अट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now