Mumbai Metro 1 Technical Glitch: तांत्रिक बिघाडामुळे घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा विस्कळीत, हजारो प्रवाशांना फटका
Mumbai Traffic Update: घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानची मुंबई मेट्रो 1 सेवा सोमवारी सकाळी एका बांधकाम साइटवरील प्लास्टिक शीट ओव्हरहेड वायरमध्ये अडकल्याने विस्कळीत झाली. या घटनेमुळे मोठा विलंब झाला आणि गर्दीच्या वेळेत हजारो प्रवाशांना अडकून पडले.
Ghatkopar to Versova Metro: घाटकोपर ते वर्सोवा जोडणारा मुंबईचा सर्वात व्यग्र मेट्रो (Mumbai Metro Glitch) कॉरिडॉर, मेट्रो-1 (Mumbai Metro 1), सोमवारी (16 जून) सकाळी तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली. सेवेत विलंब झाल्याने या बिघाडाचा फटका या मार्गावरुन हजारो प्रवस करणाऱ्या हजारो नागरिकांना बसला. हजारों प्रवासी अडकले आणि ऑफिसला जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, आजाद नगर मेट्रो (Azad Nagar Metro) स्थानकाजवळील बांधकाम साइटवरून उडालेला प्लास्टिकचा पत्रा ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरमध्ये अडकल्याने ही समस्या (Mumbai Metro Technical Issue) निर्माण झाली. यामुळे घाटकोपरहून वर्सोवाकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक खंडित झाली.
सेवा खंडित झाल्याने प्रवाशांमध्ये संताप
अनेक प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून स्टेशनवरची गर्दी, थांबलेल्या गाड्या आणि सेवा उशिराने सुरू होण्याबाबत माहिती दिली. अनेकांनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करून परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबई मेट्रो वन प्रा. लिमीटेड (Mumbai Metro One Pvt Ltd) अर्थात एमएमओपीएल (MMOPL) या मेट्रो-1 मार्गाच्या संचालन करणाऱ्या कंपनीने या घटनेची पुष्टी केली आहे. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'बांधकाम साइटवरील प्लास्टिकचा पत्रा वायरवर पडल्याने गाडीची हालचाल अडथळित झाली होती. आमच्या पथकाने त्वरित कारवाई करून अडथळा दूर केला आणि सेवा पुन्हा सुरू केली.' (हेही वाचा, Mumbai Metro Line 1 Update: प्रवाशांसाठी दिलासा! आता मुंबई मेट्रो 1 पीक अवर्समध्ये अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान चालवणार अतिरिक्त गाड्या; जाणून घ्या वेळा)
वैतागलेले प्रवासी फलाटावर
11.4 किलोमीटरचा प्रवास ठप्प
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्ग 11.4 किलोमीटर लांब असून दररोज सुमारे 4 लाख प्रवासी या मार्गाचा वापर करतात. सोमवार असल्याने आधीच गर्दीचा दिवस असतो, त्यामुळे आजच्या तांत्रिक बिघाडामुळे स्टेशन्सवर मोठी गर्दी झाली आणि लांबच लांब रांगा लागल्या.
प्रवाशाकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त
भविष्यातील धोके टाळण्यासाठी तपासणीचे आश्वासन
मेट्रो प्रशासनाने सांगितले की, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून संपूर्ण मार्गावर विशेषत: बांधकाम साइटजवळ तपासणी केली जाईल. 'पावसाळ्यात वारे अधिक जोरात वाहतात, त्यामुळे सुरक्षा उपाय अधिक काटेकोर केले जातील,' असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक आणि शहरी विकासकामांमधील समन्वयाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबई मेट्रोकडून स्पष्टीकरण
मेट्रो ट्रेन ही शहरी भागांसाठी डिझाइन केलेली एक जलद वाहतूक व्यवस्था आहे, जी जलद, कार्यक्षम आणि उच्च-क्षमतेची वाहतूक प्रदान करते. ती सामान्यतः समर्पित ट्रॅकवर चालते, एकतर भूमिगत, उंचावर किंवा जमिनीच्या पातळीवर, आणि गर्दी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी वारंवार सेवा देते. मेट्रो सिस्टीम विद्युत-चालित गाड्या वापरतात, ज्यामुळे वाहतुकीचा एक स्वच्छ आणि अधिक शाश्वत मार्ग सुनिश्चित होतो. भारतात, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये विस्तृत मेट्रो नेटवर्क आहेत, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारते आणि रहदारी कमी होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)