Maharashtra Politics: माझ्या वडिलांच्या नाही तर नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवा, उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

भाजप नेतृत्व 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेऊ शकते. मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, मोदींकडे अशी कोणती पदवी आहे जी ते दाखवूही शकत नाहीत?

Maharashtra Politics: माझ्या वडिलांच्या नाही तर नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवा, उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान
Uddhav Thackeray (PC - ANI)

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच रविवारी हिंसाचाराच्या तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) छत्रपती संभाजीनगर शहरात पोहोचले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींना काही बोलले तर ओबीसींचा अपमान होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचे पंतप्रधानांचे म्हणणे आहे, यावर प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, आमच्या प्रतिमेचे काय? विरोधी पक्षनेत्यांना त्रास दिला जात आहे. छापे टाकून अटक करण्यात येत आहे. भाजपने विरोधी पक्षांतील भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात घेतले.

रामनवमीच्या मुहूर्तावर औरंगाबादचे नामांतर झाल्यानंतर काही दिवसांनी महाविकास आघाडीने शहरात आपला मोर्चा काढला. येथे उद्धव ठाकरेंनी मंचावरून पंतप्रधान मोदींना घेरले आहे. एवढेच नाही तर पंतप्रधानांच्या पदवीबाबतही त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठाकरे यांनी भाजपला पुढे आव्हान दिले. ते म्हणाले की, तुमच्यात हिम्मत असेल तर माझ्या वडिलांच्या नव्हे तर नरेंद्र मोदींच्या नावाने महाराष्ट्रात निवडणूक लढवा.

भाजप नेतृत्व 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीसह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेऊ शकते. मोदींच्या पदवीवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले की, मोदींकडे अशी कोणती पदवी आहे जी ते दाखवूही शकत नाहीत? पुढे म्हणाले की भारतीय जनता पक्षाने आपले नाव बदलून भ्रष्ट जनता पार्टी ठेवावे, कारण ते सर्व भ्रष्ट व्यवहारांना समर्थन देते. हेही वाचा CM Eknath Shinde Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांसह 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर; शरयू नदीवर करणार आरती

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी आणि गुरुवारी राम मंदिराजवळ दोन गटात हाणामारी झाली होती. माहिती मिळताच पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र सुमारे 500 च्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेत 10 पोलिसांसह 12 जण जखमी झाले आहेत. वाढता गोंधळ पाहून पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या आणि प्लास्टिकच्या गोळ्यांचा सहारा घ्यावा लागला. यानंतर पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2023 12:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).