Bengaluru Shocker: शाळेच्या क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे 16 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या
जेव्हा तुम्ही एखाद्या यशासाठी तयारी करता तेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यात अयशस्वी होण्याच्या शक्यतेसाठीही तयारी केली पाहिजे. दुर्दैवाने, 16 वर्षांच्या मुलासाठी असे घडले नाही, त्याला शाळेच्या क्रिकेट संघात सामील व्हायचे होते. परंतु अंतिम निवडीतुन त्याला बाहेर काढण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या शाळेच्या संघात निवड व्हावी म्हणून मुलाने त्याच्या पालकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले होते.
Bengaluru Shocker: जेव्हा तुम्ही एखाद्या यशासाठी तयारी करता तेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यात अयशस्वी होण्याच्या शक्यतेसाठीही तयारी केली पाहिजे. दुर्दैवाने, 16 वर्षांच्या मुलासाठी असे घडले नाही, त्याला शाळेच्या क्रिकेट संघात सामील व्हायचे होते. परंतु अंतिम निवडीतुन त्याला बाहेर काढण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या शाळेच्या संघात निवड व्हावी म्हणून मुलाने त्याच्या पालकांना त्याची शाळा बदलण्यास सांगितले होते, शक्यतो . मात्र आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर मुलाने आत्महत्या केली. इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याने उत्तर बेंगळुरूमधील हेन्नूर येथील गेद्दलहल्ली येथे त्याच्या अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे देखील वाचा: Boyfriend Catches Girlfriend Cheating: प्रियकराने गर्लफ्रेंडला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ
हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना त्यचा मृतदेह अपार्टमेंटच्या मागील बाजूस आढळल्याने ही घटना उघडकीस आली. मृताचे वडिल इंजिनियरअसुन आणि आई गृहिणी आहे. मृत हा एकुलते एक अपत्य होते.
पोलिसांनी सांगितले की, "शालेय क्रिकेट संघात निवड न झाल्यामुळे मुलगा नाराज होता. त्याने त्याच्या पालकांना त्याला दुसऱ्या शाळेत पाठवण्यास सांगितले होते. मात्र, त्याच्या पालकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की, शैक्षणिक वर्षाच्या मध्यात हे योग्य नाही. शाळा बदलण्यासाठी रविवारी सकाळी मुलाने पुन्हा पालकांशी वाद घातला आणि घर सोडले.
दुपारी त्याच्या आई-वडिलांनी त्याला त्याच्या मोबाईलवर फोन केला आणि तो संध्याकाळ किंवा रात्री परत येईल असे त्याने सांगितले. मात्र, तो रात्री आला नाही. तो मित्राच्या ठिकाणी झोपला असेल, असे वाटून त्याचे आई-वडील झोपी गेले.” दरम्यान, मुलगा पहाटे 1:30 वाजता परतला आणि सातव्या मजल्यावरील टेरेसवर गेला आणि उडी मारली.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
तेल मानस (आरोग्य मंत्रालय) – 14416 किंवा 1800 891 4416; निम्हान्स – +91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड – ०८०-४५६ ८७७८६; वांद्रेवाला फाउंडेशन – ९९९९ ६६६ ५५५; अर्पिता आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – ०८०-२३६५५५५७; iCALL - 022-25521111 & 9152987821; COOJ मेंटल हेल्थ फाउंडेशन (COOJ) – 0832-2252525.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

