महाराष्ट्रातील उद्योगधंदे सुरु होण्याची शक्यता; रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना परवानगी देण्याबाबतचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा प्रस्ताव
महाराष्ट्रातील (Maharshtra) लॉक डाऊन (Lockdown) 30 एप्रिलपर्यंत वाढले आहे. अशात 14 एप्रिलनंतर देशव्यापी लॉकडाऊन संपल्यावर काय सुरु होईल, काय बंद असेल हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रीत जिल्ह्यांना तीन विभागामध्ये विभागले आहेत
महाराष्ट्रातील (Maharshtra) लॉक डाऊन (Lockdown) 30 एप्रिलपर्यंत वाढले आहे. अशात 14 एप्रिलनंतर देशव्यापी लॉकडाऊन संपल्यावर काय सुरु होईल, काय बंद असेल हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रीत जिल्ह्यांना तीन विभागामध्ये विभागले आहेत. गेले इतके दिवस उद्योगधंदे बंद असल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि लोकांना कामावर जाता यावे यासाठी. मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिला आहे. याचाच अर्थ काही जिल्ह्यांमध्ये तरी उद्योगधंदे सुरु होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
सुभाष देसाई ट्वीट -
महाराष्ट्रातील जिल्हे ज्या प्रकारे विभागले आहेत त्यामध्ये, 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन (Red Zone), 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे केशरी झोनमध्ये (Orange Zone) आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन (Green Zone) मध्ये समाविष्ट होतील. आता राज्यातील काही उद्योगांना पुनरुज्जीवन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार राज्यातील काही उद्योग सुरु करून, त्यांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही, तर असे 9 जिल्हे आहेत जिथे फक्त 1 रुग्ण आढळून आला आहे. (हेही वाचा: मुंबईतील एका नामांकित वाहिनीच्या सक्रीय पत्रकाराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण)
आता सरकार या जिल्ह्यात औद्योगिक उपक्रम सुरू करू शकते. हे जिल्हे अतिपरिचित क्षेत्रातील असतील तर सरकारही येथे परिवहन व्यवस्था सुरू करू शकेल. या बाबतीत कोणताही अंतिम निर्णय केंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनंतरच घेण्यात येईल. केंद्रासोबतच्या चर्चेत महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या येण्याजाण्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे. राज्यात कारखाने चालू करायचे झाल्यास कामगारांची गरज भासू शकेल, परंतु सध्या बरेच कामगार औद्योगिक केंद्रांपासून दूर अडकले आहेत.
याबाबत सुभाष देसाई म्हणाले की, 'आम्ही रेड झोनमध्ये असलेल्या कारखान्यांना वगळता उर्वरित ठिकाणच्या उद्योगधंद्यांच्या प्रस्तावांवर काम करत आहोत, जिथे मार्गदर्शक सूचना घेऊन व्यवसाय सुरु केले जाऊ शकतील.'