Mumbai Weather Update: राज्यात तापमानात वाढ, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान खात्याने जारी केला यलो अलर्ट

हिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

Representational Image (Photo Credits: Twitter)

Mumbai Weather Update: हिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, तापमान सध्या सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी अधिक आहे आणि उद्यापर्यंत उच्च राहील. 26 फेब्रुवारीला तापमानात 1  ते 2 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी तापमानात 1-2 अंशांची घट होऊ शकते, परंतु यामुळे उच्च तापमानापासून फारसा दिलासा मिळणार नाही. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे येत नसल्यामुळे तापमानात वाढ जाणवत आहे. दरम्यान, मुंबईत एक्यूआय 134 राहण्याची शक्यता आहे जी शहरातील हवेची मध्यम गुणवत्ता दर्शविते.

 जानेवारीमहिन्यात आयएमडीने फेब्रुवारीमहिन्यात सरासरीपेक्षा जास्त आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. जानेवारीत पाऊस झाला नाही. दरम्यान, आयएमडीचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले होते की, पश्चिम-मध्य, द्वीपकल्पीय आणि वायव्य भाग वगळता भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमानात वाढ होऊ शकते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement