तीन सामन्यांची वनडे मालिका गमावल्यावर कोलंबो येथे खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत यजमान श्रीलंकेने दणदणीत पुनरागमन केले आणि तिसऱ्या व अंतिम सामन्यात शिखर धवनच्या भारतीय संघावर 7 विकेट्सने मात करत 2-1 अशी मालिका जिंकली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीसह 8 विकेट्स गमावून फक्त 81 धावा केल्या.
...