⚡Mumbai Rainfall Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा मुसळधार पावसाचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. तलावांची पातळी जवळपास 60% पर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे मुंबईतील पाण्याची चिंता कमी झाली आहे.