बीएमसीने मुंबई अग्निशमन दलामार्फत नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अग्निसुरक्षा उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले की, आमचे अग्निशामक कर्मचारी पूर्णपणे प्रशिक्षित आणि नेहमी तयार असतात, परंतु नागरिकांनी काही मूलभूत सावधगिरी बाळगली, तर मोठ्या आगीच्या घटना टाळता येऊ शकतात.
...