राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नाही. प्रत्येक विभागात एक वाझे आहे आणि मंत्री आपापल्या विभागाचे राजे आहेत, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, या सरकारच्या काळात प्रत्येक विभागात भ्रष्टाचार झाला आहे. सरकारमधील प्रत्येक मंत्री आणि राज्यमंत्रीही मुख्यमंत्रीच आहे. दररोज निर्णय होतात आणि एका तासाभरातच त्याला स्थगिती येते.
...