सुरेश आत्माराम जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव यांनी बँकेत ठेव म्हणून ठेवलेली रक्कम मुलीच्या लग्नासाठी हवी होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडे चकरा मारल्या. पण अनेकदा विनंत्या करुनही पैसे न दिल्याने त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वाराला गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
...