15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला खरा. पण, मराठवाडा स्वतंत्र होण्यास तब्बल 17 सप्टेंबर 1948 हे वर्ष उजाडावं लागलं. कारण, हैदाराबद संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश होण्यास करावा लागला एक संघर्ष. या संघर्षाला लाभलेल्या यशाचे प्रतिक म्हणूनच आज गेली 71 वर्षे मराठवाडा उभा आहे. म्हणूनच जाणून घ्या या संघर्षाची कहाणी.
...