हा निर्णय पाटणा येथील एका परीक्षा केंद्रावरून आलेल्या संशयास्पद निकालांमुळे घेण्यात आला आहे. नुकतेच जाहीर झालेल्या पाचवर्षीय कायदा सीईटीच्या निकालात पाटण्यातील या एकाच केंद्रावरील चार विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले. यापैकी तीन विद्यार्थी 28 एप्रिलच्या सकाळच्या सत्रात, तर एक विद्यार्थी दुपारच्या सत्रात परीक्षा देणारा होता.
...