आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एपीएसआरटीसी) बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. रिक्षा चालक या महिलांना शेतात कामाला घेऊन जात असतांना आरटीसी बसने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण गंभीर जखमी झाले. पोन्नूर ग्रामीण सर्कलचे इन्स्पेक्टर कोटेश्वर राव यांनी सांगितले की, चेब्रोलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
...