Monsoon Treks In Maharashtra: कळसूबाई ते तोरणा मान्सून मध्ये ट्रेकिंगला कुठे जाल?
By Dipali NevarekarMay 31, 9707
कळसूबाई शिखर
कळसूबाई शिखर हे सर्वात उंच शिखर आहे. 3-4 तासांच्या ट्रेकिंगनंतर शिखरावरून दिसणारा नजारा चित्तवेधक असतो. (Photo Credit: wikimedia commons)
कर्नाळा किल्ला
रायगड जवळ असलेला कर्नाळा किल्ला गिर्यारोहकांसाठी आकर्षण आहे. पावसाळ्यात तासभराचा ट्रेक रोमांचक अनुभव ठरेल. (Photo Credit: wikimedia commons)
कोरीगड
लोणावळा मधील कोरीगड हा ट्रेकर्ससाठी पसंतीचं ठिकाण आहे. हा ट्रेकिंगला सोप्पा असल्याने पहिल्यांदाच जाणार्यांसाठी उत्तम पर्याय. (Photo Credit: wikimedia commons)
पेब किल्ला
माथेरानच्या पेब किल्ल्यावर जाताना घनदाट जंगलातून चढण्याचा अनुभव घेता येईल. हा दोन ते अडीज तासांचा ट्रेक आहे. (Photo Credit: wikimedia commons)
रत्नगड किल्ला
रतनगडला सह्याद्रीचा रत्न म्हटलं जातं. अहमदनगर मधील हा किल्ला ट्रेकर्सची पसंत असतो. त्याला चढण्यासाठी चार वाटा आहेत. (Photo Credit: wikimedia commons)
तोरणा किल्ला
तोरणा हा पुण्याजवळील ट्रेकर्सचा आवडीचा किल्ला आहे. 6-7 किलोमीटर मध्ये तो सर करता येतो.हा ऐतिहासिक किल्ला असल्याने त्याचं विशेष आहे. (Photo Credit: Wikimedia commons)
भिवापुरीचा धबधबा
कर्जतच्या भिवापुरीचा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी फुलला असतो. या ठिकाणी पावसाळ्यात हिरवळ आणि कोसळणार्या धबधब्याचा नजारा मोहक असतो. (Photo Credit: wikimedia commons)