IND vs PAK, ICC World Cup 2019: न्यूझीलंड विरुद्ध मॅच नंतर, विराट कोहलीचं लक्ष्य पाकिस्तानच्या सामन्यावर; दिली हि Warning
(Photo Credits: Getty)

भारता (India) चा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध चा सामना पावसामुळे रद्द झाल्या नंतर, विराट कोहली (Virat Kohli) चा संघ आता आपले संपूर्ण लक्ष प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध होणाऱ्या सामन्याकडे केंद्रित करत आहे. न्यूझीलंड विरुद्ध चा सामना रद्द झाल्याने संघ निराश आहे, पण आता आमचं लक्ष्य पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर असल्याचं विराट म्हणाला. पाकिस्तान समोर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्वासही विराटने दर्शवला. (ICC World Cup 2019: 'गब्बर' कधी खेळणार? विराट कोहली ने दिली शिखर धवन च्या दुखापतीवर Update)

न्यूझीलंड ची मैच रद्द झाल्यावर विराट म्हणाला, 'अनेक वर्षांपासून भारत-पाकिस्तानचे मुकाबले रोमांचक होतात. जगभरातले लोकं या सामन्यात रस घेतात. एवढ्या मोठ्या मॅचमध्ये खेळणं अभिमानास्पद आहे. या मॅचमध्ये सर्वश्रेष्ठ कामगिरी करु. आमची मानसिक तयारी पूर्ण झाली आहे. मैदानात जाऊन केलेल्या रणनितीची अंमलबजावणी करायची आहे.'

'मैदानात उतरताच सगळं शांत होतं. बाहेरुन बघितलं तर वातावरण भीतीदायक असतं, पण मैदानात तसं काहीही नसतं,' असं विराटने सांगितलं.

भारत-पाकिस्तान विश्वकप सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात (Old Trafford Stadium) खेळवला जाईल. पण, याही लढतीवर पावसाचं सावट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.